कर्ज...कर्ज काढल्याशिवाय माणूस सुधारत नाही अशी आपल्याकडे एक म्हण प्रचिलीत आहे. गंमतीत आपण म्हणतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. आपल्याला आपल्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कारणांसाठी कर्ज घ्यावे लागते जसं कि गृह कर्ज, वाहन खरेदी कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, शेती कर्ज अजून बरेच काही इ. कर्ज काढल्याशिवाय माणसाची आर्थिक प्रगती होत नाही असं म्हणतात. मला विचाराल तर हे नक्कीच खरंय. परंतु जर कर्ज घेण्याअगोदर जर तुम्ही तुमचं पुढचं आर्थिक नियोजन केलं जसं कि कोणत्या बँकेतून कर्ज घ्यायचंय, किती व्याजदर असेल, परतफेड कालावधी किती असेल इ. तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचे आर्थिक गोल्स नक्कीच पूर्ण करू शकता. परंतू कुठलेही नियोजन ना करता तुम्ही बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्हाला त्याचा तोटा होण्याचा तसेच कर्जबाजारी होण्याचा धोकाही असतो. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातील माझ्या पहिल्या घेतलेल्या कर्जाचा आणि त्यामुळे मला कसा फायदा झाला याचा अनुभव मी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे.
मी माझ्या आयुष्यातील पहिलं कर्ज म्हणून २०१२ साली शैक्षणिक कर्ज घेतलं. हो बरोबर ऐकलंत तुम्ही.... मी शैक्षणिक कर्ज काढून माझं अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले आणि मी २०१६ साली सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो.
१२ वी नंतर पुढे काय करायचे आहे तसेच ४ वर्ष अभ्यासक्रम कालावधीत अंदाजे किती खर्च अपेक्षित आहे याची गोळाबेरीज केल्यानंतर किती कर्ज काढावे लागेल याचा अंदाज आला होता. त्यानुसार मी बँकांचे व्याजदर तसेच परतफेढ कालावधी पडताळून पुढील योजना आखली.
कोणत्या बँकेतून कर्ज काढायचे आहे हे निश्चित झाल्यानंतर प्रथम मी १२ वीत असतानाच माझे खाते चालू केले आणि छोटे व्यवहार चालू केले. बँकेत जाऊन बँक मॅनेजर शी ओळख करून घेतली. त्यांना माझ्या भविष्यातील शैक्षणिक गोल्स् तसेच किती कर्ज लागेल याची माहिती दिली. तसेच कर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील आणि प्रक्रिया काय असेल याची माहिती घेतली.
१२ वीची मुख्य परिक्षा होताच कर्जासाठी लागणार्या कागदपत्रांची पुर्तता केली. अभियांत्रिकीसाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे हे निश्चित असल्यामुळे त्यानुसार प्रवेश घेतला आणि सगळ्या कागदपत्रांसहित बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला.
माझ्या मोठ्या मामांनीही मला यात खूप मदत केली. मी माझ्या मामांना आणि वडिलांना जामीनदार घेतले आणि कर्जासाठी बँकेत रीतसर अप्लाय केले. सगळया प्रक्रियेची आधीच माहिती घेऊन ठेवल्यामुळे ऐनवेळी कर्जासाठी काही अडचण आली नाही. बँक अधिकार्यांसोबत चांगली ओळख झाल्यामुळे तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यामुळे मला ६/७ दिवसात कर्ज मंजूर झाले. तसेच माझी शैक्षणिक प्रगती चांगली असल्यामुळे मला व्याजदरात १% सुट देखील देण्यात आली.
माझ्या मोठ्या मामांनीही मला यात खूप मदत केली. मी माझ्या मामांना आणि वडिलांना जामीनदार घेतले आणि कर्जासाठी बँकेत रीतसर अप्लाय केले. सगळया प्रक्रियेची आधीच माहिती घेऊन ठेवल्यामुळे ऐनवेळी कर्जासाठी काही अडचण आली नाही. बँक अधिकार्यांसोबत चांगली ओळख झाल्यामुळे तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यामुळे मला ६/७ दिवसात कर्ज मंजूर झाले. तसेच माझी शैक्षणिक प्रगती चांगली असल्यामुळे मला व्याजदरात १% सुट देखील देण्यात आली.
कर्ज मिळाल्यामुळे डोक्यावरचा भार कमी झाला पण अभ्यास करण्याचे दडपण होतेच. ४ वर्ष मी टप्याटप्याने फि साठी मंजूर कर्जातली रक्कम काढली. त्यानुसार माझ्या बाबांनी मी नको म्हणत असतानाही काढलेल्या रकमेवर फक्त व्याज भरले. याचा फायदा मला असा झाला कि मला पुढे कर्ज परतफेढ करताना पहिल्या ४ वर्षांचे व्याज द्यावे लागले नाही. त्यासाठी बाबांना मनापासून धन्यवाद!
डोक्यावरील कर्ज तसेच चांगली नोकरी मिळेल का याचे दडपण असताना अभियांत्रिकीला असताना खूप मेहनत घेतली आणि शेवटच्या वर्षाला प्लेसमेंट चालू होताच एका बहुराष्ट्रिय अमेरिकन स्थित कंपनीत माझी निवड झाली. चांगले पॅकेज मिळाले. शेवटच्या वर्षात मी काॅलेज मधे २ रा आलो आणि माझ्या IT Dept. मधे प्रथम आलो.
प्लेसमेंट झाल्याचे बँक अधिकार्यांना सांगितले आणि पेढे वाटले, त्यांनाही आनंद झाला. पुढे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मला नियुक्ती पत्र मिळाल्याप्रमाणे मी दिलेल्या तारखेला कंपनीत रूजू झालो आणि मी बँकेकडून कर्जाचे हफ्ते बांधून घेतले. मी पुढील १.५ वर्षातच मला आखून दिलेल्या हप्त्यांपेक्षा जास्त हप्ता भरत मी माझे घेतलेले शैक्षणिक कर्ज व्याजासह पुर्णपणे फेडले. त्यामुळे माझे अधिकचे व्याज वाचले आणि आता होम लोन साठी तयारी चालू आहे हाहाहा!
अश्याप्रकारे, संपुर्ण नियोजन केल्यामुळे आणि ठरलेल्या नियोजना प्रमाणे कार्यवाही केल्यामुळे माझ्या पहिल्या कर्जाचा अनुभव चांगला होता.
मित्रांनो, माझा हा पहिल्या कर्जाचा भन्नाट अनुभव आपल्याला कसा वाटला हे मला खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमचाही तुमच्या आयुष्यातील पहिला कर्जाचा भन्नाट अनुभव असेल तर आमच्या बरोबर आणि आपल्या वाचकांबरोबर नक्की शेअर करा.आम्ही त्यास आपल्या वेबसाईट वर प्रसिद्धी देऊ.
धन्यवाद.
लेखक : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक
mast
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाआपण योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे कर्जाची परतफेड वेळेत पूर्ण केली. याचमुळे आपणास पहिल्या कर्जाचा बोजा न वाटता छान अनुभव आला.
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हटवा