संत तुकाराम महाराज
आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. विविध अभंग, भारुडे, गौळणी, किर्तन यांच्या माध्यमातून संतांनी वारकरी संप्रदायाचा पाय रचला. यातील एक संत म्हणजेच संत तुकाराम महाराज.
मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)जन्म : २२ जानेवारी १६०८ देहू, महाराष्ट्रनिर्वाण : १९ मार्च १६५० देहू, महाराष्ट्रसंप्रदाय : वारकरी संप्रदायवडील : बोल्होबा अंबिलेआई : कनकाई बोल्होबा आंबिलेपत्नी : आवलीअपत्ये : महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
विशेष माहिती :
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला देहू येथे झाला.
तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असताना त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.
जे का रंजले गांजले !त्यासी म्हणे जो आपुले !!तोचि साधू ओळखावा !देव तेथेची जाणावा !!
अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला.
तुकाराम महाराज, हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे गुरु होते. संत बहिणाबाई हि तुकारामाची शिष्या तुकाराम महाराजांनी त्यांना स्वप्नात उपदेश दिला होता.
फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट