कोविड-१९ समज, गैरसमज आणि उपाययोजना | Covid-19 in Marathi

प्रसारमाध्यमांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांना मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहे तेवढे गैरसमज देखील आहेत. आपण जाणून घेऊया कोरोनाचे संक्रमण कसे टाळू शकतो? तसेच त्याविषयी नागरिकांमध्ये असलेले समज गैरसमज जाणून घेऊया.


कोविड-१९ :

कोविड-१९ हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा रुग्ण खोकल्यावर हवेत थुंकी उडते, हे थुंकीचे कण रुग्णाकडून हवेत पसरतात आणि संसर्ग हवेत पसरतो. त्यामुळं सभोवतालच्या व्यक्तींना श्वास घेतल्यावर त्यातून संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूवर कोरोनाचे विषाणू पसरतात आणि त्या वस्तूला हात लावल्याने विषाणू हाताला चिटकतात त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर जर हात चेहऱ्याला,डोळ्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.

आजाराची लक्षणे :
  • ताप
  • खोकला
  • सर्दी
  • घसा दुखणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • रक्तदाब कमी होणे
  • छातीत दुखणे
  • डोकेदुखी
  • उलट्या

आजार टाळण्यासाठी घ्यायची खबरदारी :
  • घरातून बाहेर पडताना मास्क वापरावे.
  • साबणाने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार धुणे.
  • गर्दीची ठिकाणे टाळावीत.
  • प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करु नये
  • पूर्ण शिजवलेले शाकाहारी आणि मांसाहारी अन्न खावे.
  • दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
  • खोकताना किंवा शिकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल ठेवा.

जास्त धोका कोणाला?
  • गरोदर स्त्रिया
  • मधुमेह
  • कर्करोग
  • दमा
  • उच्च रक्तदाब
  • लहान मुले

कोरोनाबाबतचे गैरसमज :

1. चिकन अंडी खाऊ नयेत : पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना पसरू शकत नाही, कारण 55 अंशांपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही.
२. लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही, अशा प्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध सध्यातरी शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्राप्त नाही.
३. कोरोना झाल्यास रुग्ण मरण पावतो हा एक गैरसमज आहे. कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते रुग्ण लवकर बरे होतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करू शकतो :

१. सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यावे.
२. रात्री झोपताना दुधामध्ये हळद टाकून प्यावे.
३. आले पाण्यात उकळून कोमट करून प्यावे.
४. नारळ पाणी घ्यावे त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही.
५. रात्री झोपताना दूध, हळद, तुळशीची पाने, लवंग, मिरे, आले, लसूण, दालचिनी दुधामध्ये उकळून काढा घ्यावा.
६. चमचाभर मध घ्यावं. मधामुळे खोकला कमी होतो.
७. खोकला असल्यास सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात.

अधिक वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करा

लक्षात ठेवा, कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.


धन्यवाद.

माहिती आभार : सौ.किर्ती प्रविण दांगट

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad